Right to Illegitimate Child
अनौरस संतती व हक्क
What Are The Rights of Illegitimate Children?
जर लग्न रद्दबातल झाले असेल अगर शून्यकरणीय व शून्यनीय (Voidable) असेल तर त्यापासून झालेली त्यांची अनौरस (Legitimate) मुले ही वाटपाच्या दाव्यात जरुरीचे पक्षकार असतात.
अनौरस मुले जी असतील त्यांना वडिलांच्या मिळकतीमध्ये हिस्सा येतो. वडिलांची स्वतःची मिळकत असेल तर अनौरस मुलाला त्या मिळकतीत हिस्सा येतो. दुसऱ्या पत्नीला फॅमिली पेन्शन किंवा इतर काही नोकरी वगैरे मिळकत नाही. परंतु दुसऱ्या बायकोची मुले वारस असतात.
परंतु एकत्र कुटुंबाची मिळकत वडिलोपार्जित असेल तर त्यामध्ये अनौरस मुलांना हिस्सा प्राप्त होत नाही.
एकत्र कुटुंबावर जर कर्ज असेल तर त्या कर्जाचा विचार वाटपाच्या वेळी करावा लागतो. कित्येक वेळेस वाटप केले जाते त्या वेळी एकत्र कुटुंबाचे कर्ज किती होते, ते पाहिले जाते. कित्येक वेळेस वडिलोपार्जित कर्ज मुलांना द्यावे लागते. काही Loan किंवा कोणती देणी असतील किंवा गहाण ठेवलॆली मिळकत सोडविणे असेल या सर्वांचा विचार वडिलोपार्वाजित मिळतीचे वाटपाच्या वेळी केला जातो. कित्येक वेळेला वडील पूर्वीचे कर्ज भागविण्यासाठी एकत्र कुटुंबाच्या मिळकतीची विक्री करतात असे करणे हे हिंदू कायद्यामध्ये- Pious Obligation म्हणजेच धार्मिक बंधन समजतात
धार्मिक कर्तव्याचा (Pious Obligation)सिध्दांत असा आहे की, वडिलांचे कर्ज हे मुलांनी फेडायचे असते व हा भाग धार्मिक कृत्याचा म्हणून समजला जातो. जर एखाद्या माणसाचे कर्ज दिले गेले नाही आणि तो कर्जबाजारी मेला तर त्याच्या आत्म्याला अमंगल परिणामाला तोंड द्यावे लागते किंवा त्याच्या आत्म्याला शांती मिळत नाही व वडिलांच्या आत्म्याला वाईट परिणामापासून वाचविण्यासाठी किंवा सदगती मिळण्यासाठी मुलांना वडिलांचे कर्ज भागवावे लागते असा या तत्त्वाचा पाया हा आध्यात्मिक आहे आणि त्याचा मुख्य हेतू वडिलांना ज्यांनी कर्ज दिले त्यांचा फायदा व्हावा हे गृहीत नाही. हे धार्मिक कर्तव्य आहे. ते व्यावहारिक कर्ज फेडण्यासाठी आहे.
कित्येक वेळा मुलांना ते कर्ज हे अयोग्य कारणासाठी होते हे शाबीत करावे लागते व ते खरेदीदारास माहीत होते असे दर्शवावे लागते. अशा वेळेस त्या कर्जाची जबाबदारी मुलांवर येत नाही. म्हणून पूर्वीचे कर्ज फेडण्यासाठी मिळकत गहाण टाकली असेल तर किंवा दरखास्तीतील मिळकत विकली गेली असेल तर ते कर्ज अव्यवहार्य आहे व त्याची माहिती खरेदीदारांना होती हे मुलांना दर्शवावे लागते.
हिंदू वारसा दुरुस्ती कायदा 2005 हा अमलात आल्यावर मुलाची, नातवाची , पणतुची, त्याच्या वडिलांच्या, आजोबाच्या किंवा पणजोबाच्या कर्जाच्या परतफेडीबाबत पवित्र देणे आहे असे समजून ती देण्याची जबाबदारी आहे, असे न्यायालयाने मानू नये. परंतु जे कर्ज दि हिंदू वारसा दुरुस्ती कायदा 2005 पूर्वी घेतले असेल तर या कायद्यातील उपकलम लागू नाही.
वडिलांची स्वतंत्र मिळकत आहे. तर त्यात अनौरस मुलांना हक्क प्राप्त होतो.
मूल हे जर शून्यकरणीय लग्नापासून किंवा निरर्थक लग्नापासून झाले असेल तर ते (अनौरस) ठरते. तो किंवा तीला मयत वडिलांच्या मिळकतीत हिस्सा मिळतो.